Showing posts with label सप्तरंग. Show all posts
Showing posts with label सप्तरंग. Show all posts

Saturday, March 5, 2011

सप्तरंग



महाराष्ट्र शासनाने गेल्या तीन वर्षांपासून मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियाच्या प्रासादात गीत-संगीत-वादन-नृत्यांचे कार्यक्रम घेऊन, हुतात्म्यांच्या शौर्याला आणि मुंबईकरांच्या धैर्याला मानवंदना देण्याची परंपरा 'सप्तरंग' महोत्सवाच्या माध्यमातून सुरू केली. ती याही वर्षी त्याच धीरगंभीर वातावरणात सुरू झाली. यावषीर्ची सुरुवात भल्या पहाटेच्या 'स्पिरिच्युअल मॉर्निंगने' झाली. उस्ताद अमजद अली खान आणि उत्साद झाकीर हुसेन यांच्या स्वगीर्य वादनाने श्रोते आणि ही वास्तू धन्य झाली! उस्ताद अमजद अली खां साहेबांनी यावेळी व्यक्त केलेली भावना - 'महाराष्ट्र शासन सही जगहपर सही रागों का आयोजन कर सही काम कर रही है', आयोजनाची पावती देऊन गेले. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातफेर् दि. १८ ते २३ फेब्रुवारी या कालावधीत मुंबईतविविध सात ठिकाणी आयोजित हा सांस्कृतिक सोहळा मुंबईकरांना अविस्मरणीय मेजवाणी देवून गेला.

Related Posts Plugin for WordPress, Blogger...