उद्या म्हणजे २५ मार्चला नविन मराठी चित्रपट ’दोन घडीचा डाव’ रिलीज होतोय. पीव्हीआर, बिग सिनेमा, फेम, सिनेमॅक्स अश्या सगळ्या मोठ्या थियेटर मधे रीलीज होत असून सुद्धा कुठेही प्रसिद्धी नाही.
ही उदासिनता आहे मराठी चित्रपटाबाबत निर्माता आणि दिग्दर्शकाची. बरं निर्माती आहे कांचन अधिकारी, चित्रपट क्षेत्रातलं एक मोठ नाव. कलाकार आहेत अजिंक्य देव, मकरंद अनासपुरे, सयाजी शिंदे आणि सई ताम्हणकर. ही सर्व कलाकार मंडळी सुद्धा निर्माता/दिग्दर्शका इतकीच उदासीन. कसं होणार मराठी चित्रपट सृष्टीचं???